Abstract : खानदेशातील डॉ. उत्तमराव पाटील प्रतिसरकारच्या कार्यक्षेत्रात दाखल झाल्याने, त्यांच्या रुपात व त्यांच्या सहकाज्यांच्या निमित्ताने सातारच्या प्रतिसरकारच्या चळवळीस खानदेशातील भूमिगतांचाही हातभार लागला होता. सातारा आणि खानदेश यांच्या संबंधावर प्रादेशिक इतिहास लेखनाच्या अंगाने चर्चा करणे अगत्याचे आहे. दोन्ही प्रादेशिक विभागात 1942 च्या चले जाव आंदोलनाची सुरुवात 9 ऑगस्ट 1942 पासून सुरु झाली.