Abstract : आधुनिक जीवन शैलीत मन आणि शरीर यांचं सामंजस्य आणि संतुलन हरवून गेलं आहे. परिणामी वाढता रक्तचाप, मधुमेह, अनिद्रा, कॅन्सर, हृदय विकार,इत्यादी तणावयुक्त आणि प्राणघातक रोगांनी मानवी जीवन ग्रासून गेलं आहे. अश्या गंभीर आजारांची रोकथाम आणि त्यावर परिणामकारक इलाज शोधण्याच्या प्रयत्नामुळे चांगली जीवन शैली आणि उत्तम उपाययोजनाचा शोध लावण्यासाठी गती मिळाली, ज्यात योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार सारख्या प्राचीन विषयाचा पुनश्च शोध करण्याचा अंतर्भाव आहे